Friday 19 February 2016



                                                         



                                   कस सांगू तुला , तू काय आहे माझ्यासाठी ,
                                   शब्दांना ही काही मर्यादा असतात ना.....

                                                   तुला मांडत असताना माझा मीच हरवून जातो ,
                                                   मग काळ वेळ मर्यादा काही उरत नाही .
                                                   त्या पहिल्या भेटीपासून , शेवटच्या भेटीपर्यंत ,
                                                   मी अनादी काळ तरंगत असतो 
                                                   व्यक्त-अव्यक्त भावना , आवडत्या-नावडत्या गोष्टी ,
                                                   तुझ्यासमोर मांडत असतो माझा मीच ,
 
                                     पण तुझ्या डोळ्यांतील भाव , काही उमगतच नाहीत ,
                                     शब्दांना काही मर्यादा असतात हेच खर !!!!

Thursday 26 December 2013

मैत्री


मैत्री - मध्ये , सहवास हवा , असे काही नाही ;
नेहमीच भेटी गाठी व्हाव्यात असेही काही नाही


नेहीमीच गप्पा , टिंगल-टवाळी असावी , असे काही नाही ;
सगळच काही सांगाव असही काही नाही ;

अधून मधून आठवण मात्र असू दे ,
हो मात्र ती आठवण " काढावी " असेही काही नाही ;

आनंद-क्षण वाटावाच अस काही नाही ,
हो मात्र अडचणीत साद -प्रतिसाद असू दे अंतरातून ;

मात्र सहवास हवाच अस काही नाही …………………

Saturday 6 April 2013

दुष्काळ



दुष्काळ येथे , जल्लोष तिकडे
हाल इकडे , समृद्धी नांदे तिकडे







आमच पाणि त्यांनी पळवल ,
त्याचं पाणि  यांनी पळवलं
या पळवापळवीत  " माणुसकी" च पळवली जाते,
इकडे - तिकडे सगळीकडे







पाण्याच ठीक आहे हो …………
संवेदनाच थीटल्या जेथे ,
जाणिवांचा " दुष्काळ" येतो  तेथे
जाणिवांचा " दुष्काळ" येतो तेथे.



Saturday 16 February 2013

प्रेमाची गोष्ट



प्रेमाची गोष्ट



सुंदर अशी ही प्रेमाची गोष्ट ,
जशी तुझी तशी माझी पण,

प्रेमातील रुसवा-फुगवा , आनंद - दु: ख , तो हळुवारपणा
जसा तुझा तसा माझा पण

तो अबोलपणा , ती साद , ते आकाश , तो चंद्र ती चांदणी ,
जस तुझ तस माझ पण







आता गोष्ट थांबल्याची जाणीव करून देणारा दुरावा ,
हा विरह , हे अश्रू
जसे तुझे तसेच माझे पण

गोष्ट जरी थांबली , तरी प्रेम थांबत नाही
ती ओढ , नात्याचा आदर
अजूनही साद देतो अंतरातून

 जश्या तुझ्या , तश्याच माझ्या  पण ..............




Tuesday 29 January 2013



चल मन चले हम उस दुनिया ,
जहा न हो कोई गरीब न हो कोई  अमीर ,
और न हो कोई शोषण 


                                        चल मन चले हम उस दुनिया ,
                                        जहां  न हो कोई नर-नारी ,
                                        हो  तो बस इन्सान हो


  चल मन चले उस दुनिया ,
   जहा ख़ुशी हो साथ और दर्द का भी हो एहसास ,
   इस एहसास कि हो जहां कदर ,
    हो कोई  प्यारा हमसफर

                                     चल मन चले हम उस दुनिया ,
                                      जहां  विकास और हरियाली हाथो में हाथ डाले चले ,
                                      जहां  प्रकृती क्षण -क्षण में  निवास करे ,


चल मन चले हम उस दुनिया ,
जहां जीने का मजा भी आये ,
और मरने का गम भी न हो .................................
             
                                

Monday 28 January 2013

हाक .......


आक्रोशली एक हाक  ,थिजले  तिचे सर्व प्रयत्न '
"मला जगायचं आहे खूप ... " असं म्हणून गेली ती

 














सर्व शब्द नि :शब्द  झाले आज ,
भावना ओसरल्या जागीच ,
तिच्या आठवणींचा एक कवडसा ,
 तिच्या शोर्याची एक तिरीप ,
आपण बाळगूया मनी ,

 देत निरोपाचा हात तिला ,
लढण्याचे वचन देउनी ,
स्फुल्लिंग पेटवू या जीवनी ,


आक्रोशाली एक हाक .........................





Saturday 19 January 2013

संकल्प हरित पर्यावरणाचा




                       "पर्यावरण संवर्धन " ,  "जागतिक तापमान वाढ (ग्लोबल वार्मिंग) "  हे अलीकडे खूप परवलीचे शब्द झाले आहेत.  रोज वर्तमान  पत्र , टीव्ही  आदी  वेगवेगळ्या माध्यमांमध्ये आपण पर्यावरण संवर्धन , ग्लोबल वार्मिंग याबद्दल बरच काही ऐकतो, पाहतो . काही लोकांसाठी हे शब्द फक्त शब्दच ठरतात , तर काहींसाठी हेच जीवनाच ध्येय ठरत .पर्यावरण संवर्धना बाबतीत आपल्या समाजात  विरोधाभास आढळतो . या समाजात  पर्यावरणास हानीकारक ठरणारी चंगळवादी वृत्ती आढळते तर याच समाजाचा भाग असलेले  गजेंद्र सिंग यांच्या सारखे व्यक्तिमत्व आपल्या "तरुण भारत संघा " च्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन ( सारिस्का ,  अरवली बचाओ आंदोलन , जोहड च्या माध्यमातून जलसंवर्धन  ईत्यादी ) यासाठी झटत असतात. आणि मग समाजातील  एक मोठा गट यांना असामान्य म्हणत सर्वासामान्यांपासून वेगळ करवून टाकतो. अस केल्यामुळे सर्वसामान्यांची जबाबदारी संपते ना ! कारण या "  विशेष लोकांसारख" सामान्य वागू शकत नाही , संपली सामान्यांची जबाबदारी , ना ? खर पाहता बहुतांश लोकांना काहीतरी करायचं मात्र असत ,
पण नेमकी सुरुवात कशी करायची? किंवा मी एकट्यान केल तर काय फरक पडेल ? अशा प्रश्नातच बरीच घुटमळत राहतात . तस  म्हणायला गेल तर पर्यावरण संवर्धन या बाबतीत" काहीतरी " करायची नवीन वर्षाच्या संकल्पाच्या  निमित्ताने संधी चालूनच  आली आहे , आणि तस पाहिलं तर सुरुवात हि पहिल्या पावलानेच होत असते .  तर चला  हरित संकल्पाकडे पहिल पाऊल  टाकूयात ........
                      पर्यावरनाचा ह्रास हा  चंगळवादी प्रवृतीचा परिणाम आहे. वाढत प्रदूषण , तापमान वाढ , जंगलतोड ,  हवामान बदल या एकमेकांशी निगडित समस्या आहेत. आणि या समस्यांच्या  समाधानच केंद्रबिंदू म्हणजे आपण "सामान्य" माणस. आपली जगण्याची प्रक्रिया, विकासाची प्रक्रिया म्हणजेच उत्क्रांतीची प्रक्रिया जर आपण निसर्गपूरक केली तर यातील बहुतांश समस्या राहणारच नाहीत.
उदाहरणार्थ उर्जा वापर , आपण सर्वांनी उर्जेचा वापर काटेकोरपने (efficiently) केला तर किती तरी समस्या सुटू शकतील. या उर्जे मध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव होईल . वीज , पेट्रोल , पाणि , इतर इंधन वगैरे गोष्टी उर्जेचा स्त्रोत म्हणून आपण वापरतो . या उर्जेचा काटेकोर आणि डोळस पाने वापर केल्यानंतर किती तरी समस्या सुटू शकतील. गोष्ट तशी खूप साधी आहे. आपल्या घरी , ऑफीस मध्ये विजेचा,पाण्याचा  डोळस ,कार्यक्षम ,प्रभावी वापर म्हणजेच काय तर यांचा अपव्यय टाळणे. उदाहरणार्थ -- १.  गरज नसताना पंखे बंद करणे  २. टिव्ही पहायचा नसेल तर टीव्हीचा मुख्य स्विच बंद करणे. ३. गरज नसताना दिवे बंद करणे. ४. चांगल्या "वीज बचत क्षमता " असलेल्या उपकरनांचा वापर इत्यादी . तास पाहता या गोष्टी खूप सोप्या आणि सध्या आहेत पण याचा परिणाम खूप दूरगामी आणि मोठा होईल.
                    विजेच्या डोळस वापराचा हा हरित संकल्प पर्यावरण संवर्धनास खूप चालना  देऊ शकतो. कारण उर्जा बचत (वीज बचत) हे एक प्रकारे वीज निर्माण केल्यासारखच आहे.याचे तिहेरी फायदे आहेत . पहिला फायदा वीज बिल बचत दुसरा वीज बचतीमुळे वीज पुरवठा व्यवस्थापन चांगल होईल आणि तिसरा फायदा होईल अप्रत्यक्षपणे पर्यावरणावर कमी तान .कारण वीज निर्मिती मध्ये एक तर प्रचंड साधनसंपत्ती लागते (कोळसा , डीझेल , LPG/LNG  ) आणि या इंधनाच्या ज्वलनामुळे होणारे प्रचंड प्रदूषण आणि हि इंधने काढण्यासाठी लागणारी प्रचंड उर्जा आणि त्यामुळे होणारे प्रदूषण .म्हणजे हि सगळी प्रदूषणाची साखळी आहे.आपला कार्यक्षम वीज वापर प्रदूषण भार  कमी करू शकते.  आता हे पटण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूयात. समजा एका शहरात दोन नगर (colonies ) आहेत . कॉलोनी x आणि कॉलोनी y . या मध्ये प्रत्येकि  चार घर आहेत ( a,b,c आणि d ),  कॉलोनी x  मधील  a,b,c,d या घरांनी प्रत्येकी  X1 , X2 , X3 , X4 एवढे युनिट वीज बचत केली .त्याच प्रमाणे कॉलनी y मधील घरांनी Y1, Y2 , Y3  आणि Y 4  युनीट  एवढी बचत केली . म्हणजे शहराची संपूर्ण बचत म्हणजे या सगळ्या बचतीची बेरीज . समजा शहराची एकूण बचत Cs युनीट आहे . आता समजा जर Cs युनिट उर्जा निर्माण करायला किती साधन संपत्ती लागली असती आणि त्यामुळे किती प्रदूषण जाहले असते. समजा या Cs  युनिट उर्जा तयार करण्यासाठीचा कार्बन फूटप्रिंट किंवा कार्बन इक्वीव्ह्यालंट  हे विचारात घेतल्यावर आणखी एक फायदा मिळू शकतो. कार्बन  फूटप्रिंट म्हणजे एखाद्या प्रक्रियेमुळे , लोकसंख्येमुळे होणारे हरित -गृह वायू उत्सर्जन याची मोजणी . या वीज बचती च्या संकल्पात शासन , किंवा शासनाची संस्था , विद्युत मंडळे , विदयुत निर्मिती कंपन्या यांची साथ मिळाल्यास
या कार्बन इक्वीव्ह्यालंट चे  कार्बन क्रेडिट्स मिळवून आणखी निधी / पैसा मिळवता येऊ शकतो . जर हि वीजबचत मोहीम एका घरातून , कॉलोनी , शहर , विभाग , राज्य , देश अशी वाढत गेली तर किती वीजबचत होऊ शकेल आणि किती प्रचंड प्रमाणात पर्यावरणावरचा ताण कमी होऊ शकेल. फक्त गरज आहे छोट्या छोट्या  कृतीची , खूप साध्या साध्या  गोष्टी/ सवयी मुले आपण वीज बचत करू शकतो . आणि फक्त वीज च नाही तर आपण पाणी , इंधन या बाबतीत सुद्धा कार्यक्षम वापर करून खूप काही साध्य करू शकतो. गरज आहे हा उर्जेचा कार्यक्षम वापर हा हरित संकल्प पूर्ण अमलात आणायची .
                               या सध्या हरित संकल्पाबरोबरच  , आपण अजून एक छोटासा हरित संकल्प करू शकतो तो म्हणजे आपल्या घरातील कचरा व्यवस्थापनाचा . आपण सर्व ,शहरातील कचरा समस्येवर चिंतीत होतो , नगर परिषद , नगर पालिका यांना  शिव्यांची लाखोली वाहून मोकळे पण होतो पण या समस्येच समाधान छोट्याशा कृतीतूनच होईल आणखी एक छोटस पाउल , आपल्या घरच्याच कचरा व्यवस्थापनाच .  साधी गोष्ट आहे , आपल्या घरातच कचरा वेगळा करायचा प्लास्टीक (non bio-degradibles)  आणि नैसर्गिक रित्या विघटन होणारे असा कचरा वेगळा करायचा. जर सर्वच लोकांनी / घरांनी , कार्यालयांनी, शाळांनी , वस्त्यांनी असा कचरा वेगळा साठवायला सुरुवात केली , तर कचरा व्यवस्थापन खूप सोप तर होईलच आणि केवळ  प्लास्टीक कचरा प्रक्रिया करणे स्थानिक स्वराज्य संस्थाना सोप होईल . कचरा वेगळ करन त्यांना सोप जाईल मग incinerator मार्फत स्थानिक स्वराज्य संस्था यावर प्रक्रिया करू शकतील.
तसेच नैसर्गिकरित्या विघटन होणाऱ्या कचऱ्या पासून खात निर्मिती आदी प्रकल्प चालवता येतील . ग्रामीण भागात बचतगटांच्या सहकार्याने हे प्रकल्प चालवता येतील. हे प्रकल्प अगदी वार्डस्तरावर सुद्धा राबवता येऊ शकतील. कचऱ्या पासून वीज निर्मिती चे प्रकल्प सुद्धा होऊ शकतात ( उदा -- पिंपरी-चिंचवड येथील प्रकल्प ).
स्वत: च्या घरातील कचरा व्यवस्थापन व्यवस्थित संभाळल तर शहराच  कचरा व्यवस्थापन संभाळता येईल . त्यामुळे शहर तर सुंदर होतीलच पण खात प्रकल्प , वीज प्रकल्प आदी फायदा पण मिळवता येईल .
                          वीज बचत आणि कचरा व्यवस्थापन (स्वत : च्या घरचे ) ,   हे हरित संकल्प खूप साधे आणि सोपे  आणि विशेष म्हणजे करण्यासारखे आहेत . आपल्या कधी वाचनात आलच असेल वृक्षो रक्षति रक्षत : त्याच धर्तीवर पर्यावरण रक्षति रक्षत : अस सुद्धा म्हणता येईल आणि ते खर्च आहे. तर मग तयार आहोत ना आपण सर्व जन हे छोटेसे संकल्प अमलात  आणण्यास , नाहीतर "पण  लक्षात कोण  घेतो ? " हे नेहमीचच झाल आहे .......