सत्यमेव जयते , स्त्री-भ्रूण हत्या आणि आपण
आरसा रोजच्या वापरातील महत्वाची वस्तू . आपल प्रतिबिंब दाखवणारी वस्तू .आपल " सत्य" रुप दाखवणारी वस्तु . आपल्या बाह्य व्यक्तिमत्वास "कुठे सुधरायचं " आहे ते दाखवणारी वस्तू ......
आमिर खानचा " सत्यमेव जयते " हा समाजाचा आरसाच वाटला. समाजाचं " सत्य" "दाखवणारा "सत्यमेव जयते" नावाचा आरसा." स्त्री-भ्रूण हत्या" या दाहक वास्तव्यास समोर आणणारा आरसा.
विषय तसा जुनाच " स्त्री-भ्रूण हत्या". जेवढा जुना तेवढाच दाहक .
आई,बायको म्हणून आवडणारी स्त्री मुलगी म्हणून का नको हा खूप विचार करायला लावणाराप्रश्न आहे. ग्रामीण आणि अशिक्षित (अडाणी) लोकांपेक्षा शहरी आणि तथा-कथीत "एजुकेटेड " वर्गात स्त्री-भ्रूणहत्येच प्रमाण जास्त आहे , हे वास्तव डोळयात अंजन घालणारे आहे. देवापेक्षाही ज्याला समाज मोठा समजतो त्या "डॉक्टर" लोकाचा यातील सहभाग मनाला चटका लावणारा आहे आणि त्याहीपेक्षा मोठा विरोधाभास असा की बहुतांश वेळेस एक सासू (एक स्त्री ) आपल्याच सुनेला ( ती पण एक स्त्री ) भ्रूण हत्या करण्यास भाग पाडते .
भ्रूण हत्या आणि त्याचे दुष्परिणाम ,भ्रूण हत्या रोखण्यासाठीचे उपाय , कायदे या तांत्रिक गोष्टीत मला शिरायचे नाही . दुष्परिणाम , आकडेवारी हे आहेच . पण खरा प्रश्न आहे तो वृत्ती सुधारण्याचा.आपल्या सर्वांच्या खूप खोल आत राहिलेली वृत्ती(पुरुषांच्या आणि आश्चर्य-कारकऱीत्या स्त्रियांच्या सुद्धा).वृत्ती स्त्री ला नेहमी एक पायरी खालचा दर्जा देण्याची,त्यांना दुय्यम स्थान देण्याची.वेळ आली आहे या वृत्ती ला बदलण्याची,या विचारला छेद देण्याची.कारण कायदे,नियम हे वरवरचे उपाय असतात.
खरा उपाय हा विचारांचाच आहे.तुमच्या आणि माझ्या विचारांचा. आणि हा साधासोपा उपाय म्हणजे "समानतेचा" विचार .
"पण लक्षात कोण घेतो ?" हे आता नेहमीचच झाल आहे..............
.
बाकी " सत्यमेव जयते " ला खूप खूप शुभेच्छा आणि समाजाचा आरसा झाल्याबद्दल धन्यवाद .
(टीप : आजकाल आपणास हवा तसा आरसा करून घेता येतो , म्हणजे जाड लोकंना बारीक दिसणारा आरसा मिळतो . ठेंगू लोकंना उंच दाखवणारा आरसा पण असतो . समाजास असा आरसा मिळू नये हीच प्रार्थना ...)
जाता जाता ,कमनशिबी आई -बाबांस
कदाचित ती हि उमलली असती ,
अंगण सुगंधित करत ,
कदाचित ती हि बागडली असती
आसमंत दणाणून सोडत
कदाचित तिनेही दिली असती
साद " अंतरातून " आई - बाबा" म्हणून
कदाचित ती हि बिलगली असती खास ,
लटक्या रागातून ,
कदाचित तिनेही वाटला असता "आनंद - प्रसाद "
आपल्या इवल्या इवल्या हातातून
कदाचित तिनेही धरला असता हात ,
थरथरत्या प्रसंगातून
कदाचित .............